Thursday, 16 February 2012
पाणी टंचाईचे संकट | ||
बोधेगाव। दि. १६ (;वार्ताहर)- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील पस्तीस गावांमधील विहिरींनी तळ गाठला असून भू-जल पातळीही खोल गेली आहे. त्यामुळे या गावांवर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव परिसर नेहमी दुष्काळी पट्टय़ात येत असल्याने पर्यन्यमानही जेमतेम असते. चालू हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विहीर बागायत क्षेत्र धोक्यात आले आहे. थोड्याफार पाण्यावर जनावरांसाठी मका, घास, गवत शेतकर्यांनी घेतले. परंतु 'महावितरण' च्या असहकाराच्या धोरणामुळे खंडित होणार्या वीज पुरवठय़ामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. लाडजळगाव, शेकटे, लमाणतांडा, चिकणी तांडा, नागलवाडी, गोळेगाव या भागात शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पिकांना पाण्याच्या पाळय़ाही जास्त द्याव्या लागत असून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. ऊस पिकाच्या फुटण्यावर मध्यंतरीच्या थंडीचा परिणाम झाला आहे. कोम फुटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ठिबक सिंचनावर पिके घेणार्या शेतकर्यापुढे विजेची समस्या असल्याने पीक धोक्यात आले आहे. परिसरातील उसाचे क्षेत्र संपल्याने साखर कारखान्याचा गळीत हंगामही लवकर आटोपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोधेगाव भागात सध्या चार्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. आठवडेबाजारात कडब्याची पेंढी पंधरा रुपयास तर घास, मका या हिरव्या चार्याचा भावही गगनाला भिडला आहे. जून महिन्यात लागवड केलेल्या उसाचा वापर जनावरांना चारा म्हणून शेतकरी करीत आहेत. गुंठय़ाचा भाव अडीच ते तीन हजारापर्यंत गेला आहे. शेततळे कोरडे कोट्यावधी रुपयांचे अनुदान देऊन बोधेगाव परिसरात सुमारे दोनशे ते तीनशे शेततळी झाली. परंतु यंदा कमी पाऊस झाल्याने ती कोरडी आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे अनुदान मातीत गेले आहे. वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करुन मध्यवर्ती ठिकाणी चाराडेपो सुरु करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. |
Monday, 23 January 2012
Saturday, 21 January 2012
सबलीकरणावर कार्यशाळा बोधेगाव । दि.२१ (वार्ताहर) येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयात महिला सबलीकरणावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रौढ निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.के. फसले होते. मुलगी दोन्ही घरचा दिवा असते. तिने स्वत:मधील स्त्रीत्वाचा साक्षात्कार ओळखून मानसिक प्रबळ होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेवगाव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. छाया भालशंकर यांनी केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलींनी स्वसंरक्षणासाठी निरनिराळय़ा धाडसी, पराक्रमी महिलांच्या कामगिरींचा अभ्यास करणे महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. निर्मला पवार यांनी मुलींच्या समस्या, प्रश्न, खुल्या चर्चेव्दारे समजावून घेतल्या. डॉ.पल्लवी गलांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील मुलींच्या माता पालक मनिषा शिंदे, व्दारका शिंदे, चैनाबाई छाजेड, छाया छाजेड, रेणुका शिंदे, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच परिसरातील महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. प्रा. गजानन लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.सबलीकरणावर कार्यशाळा बोधेगाव । दि.२१ (वार्ताहर) येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयात महिला सबलीकरणावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रौढ निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.के. फसले होते. मुलगी दोन्ही घरचा दिवा असते. तिने स्वत:मधील स्त्रीत्वाचा साक्षात्कार ओळखून मानसिक प्रबळ होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेवगाव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. छाया भालशंकर यांनी केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलींनी स्वसंरक्षणासाठी निरनिराळय़ा धाडसी, पराक्रमी महिलांच्या कामगिरींचा अभ्यास करणे महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. निर्मला पवार यांनी मुलींच्या समस्या, प्रश्न, खुल्या चर्चेव्दारे समजावून घेतल्या. डॉ.पल्लवी गलांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील मुलींच्या माता पालक मनिषा शिंदे, व्दारका शिंदे, चैनाबाई छाजेड, छाया छाजेड, रेणुका शिंदे, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच परिसरातील महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. प्रा. गजानन लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.
सबलीकरणावर कार्यशाळा बोधेगाव । दि.२१ [गणपत दसपुते] येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयात महिला सबलीकरणावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रौढ निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.के. फसले होते. मुलगी दोन्ही घरचा दिवा असते. तिने स्वत:मधील स्त्रीत्वाचा साक्षात्कार ओळखून मानसिक प्रबळ होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेवगाव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. छाया भालशंकर यांनी केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलींनी स्वसंरक्षणासाठी निरनिराळय़ा धाडसी, पराक्रमी महिलांच्या कामगिरींचा अभ्यास करणे महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. निर्मला पवार यांनी मुलींच्या समस्या, प्रश्न, खुल्या चर्चेव्दारे समजावून घेतल्या. डॉ.पल्लवी गलांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील मुलींच्या माता पालक मनिषा शिंदे, व्दारका शिंदे, चैनाबाई छाजेड, छाया छाजेड, रेणुका शिंदे, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच परिसरातील महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. प्रा. गजानन लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. |
Friday, 20 January 2012
पस्तीस गावांवर विजेचे संकट | ||
बोधेगाव दि.१९ (वार्ताहर) | ||
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील पस्तीस गावांमध्ये वीज प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक रोहित्रे जळाल्याने ऐन हंगामात पिके पाण्यावाचून धोक्यात आली आहेत. 'महावितरण'च्या बालमटाकळी उपकेंद्रातील पस्तीस गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक रोहित्रे महिन्यापासून विजेच्या कमी-अधिक दाबामुळे निकामी झाली आहेत. त्यामुळे ऐन हंगामातील ज्वारी, ऊस, हरभरा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत. याबाबत या भागातील शेतकर्यांनी 'महावितरण'शी संपर्क केला असता रोहित्रावरील थकबाकी भरलेली बिले दाखवा, त्यानंतरच नवीन रोहित्राची शिफारस आपण वरिष्ठांकडे करु, असे उत्तर मिळते, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. थकबाकी भरण्यासाठी शेतकर्यांकडे सध्या उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र नाही. भावाअभावी कापूस घरात पडून आहे. कापसाचे उत्पादनही यंदा निम्म्याने घटल्याने हातात पैसा नाही. त्यामुळे बिलासाठी पैसे कोठून आणायचे ? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी गहू, हरभरा तसेच नवीन ऊस लागवडही धोक्यात आली आहे. वीज नसल्याने शेतकर्यांना जनरेटरची मदत घ्यावी लागते. जनरेटरचा खर्च करुनही काही शेतकरी वैतागले आहेत. या भागातील रोहित्रांचा अहवाल 'महावितरण' ने तातडीने नगरला मुख्य कार्यालयाकडे पाठवावा, अशी मागणी होत आहे. |
Subscribe to:
Posts (Atom)

